कृषि उत्पन्न बाजार समिती, औराद शा.
मनुष्य जन्मापासून भूक भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून होता.अश्मयुगात मनुष्याला निसर्गापासून झाडाची फळे, अन्नधान्याचे ज्ञान आत्मसात झाले, उदर भरणे कामी याचा वापर सुरु झाला. एका हंगामातील फळे, फुले, अन्न हंगाम संपले नंतर मिळत नाहीत, त्यामुळे हंगाम चालू असताना त्या धान्याचे साठवण करणे आणि हंगामाच्या सुरुवातीस त्यांचे बीज टाकण्याची प्रक्रिया छोट्या क्षेत्रावर सुरू झाली. त्यातून शेती करण्याचे ज्ञान आत्मसात झाले.
पुढे चालून वस्तू विनिमय पद्धत चालू झाली. बदलत्या काळाप्रमाणे विक्री व्यवस्था नाण्याच्या मोबदल्यात धान्य देणे सुरुवात झाले, गावे,शहरे वसत गेली, वाढत लोकसंख्या व वाढत्या गरजा यातून खरेदी विक्रीच गती मिळत गेली. भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळे राज्य त्यांचे राजशाही शासक होते, अखंड भारतासाठी शेतीविषयक वेगवेगळी राज्य व वेगवेगळी नियमावली तयार झाली, कालांतराने ब्रिटिशाचे राज्य भारतावर आले जमीनदारी, रयतवारी,महालवारी पद्धत कायदे आणले.कायदा दक्खन राहत कायदा 1879 विविध कृषी धोरणामुळे भारतीय शेतीचे व्यवस्थीकरण झाले.
सर्व माहितीसाठी....
